Skip to main content

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..!

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..!




पहाटे ‘जॉगिंग’साठी करूळ घाटात गेलो होतो. घाटाच्या मध्यावर एक ऊसाचा ट्रक उलटलेला दिसला.

“कुणाला लागलं आहे का?” तिथे बसलेल्या शेतकऱ्याला मी विचारले.

“न्हाई, सायेब... मेलो असतो तर चाललं असतं... ऊस पण गेला आन् गाडी पण गेली,” तो.

“काही मदत हवी असेल तर सांगा,” मी.






फिरून परत येईपर्यंत शेतकऱ्याच्या घरची माणसं तिथे पोहोचली होती.


‘वरसाची कमाई पाण्यात गेली’ म्हणून ती मोठमोठ्यानं रडत होती.
.
.
.

त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारमधून एक स्त्री खाली उतरून शेतकऱ्याला म्हणाली, “थोडा ऊस द्या की... संक्रातीला पूजा करायला पाहिजेत.”

“परसंग काय आन् तुमचं काय, ताई?! घ्या ऊस... पर हे ऐकण्यापेक्षा मी मेलो असतो तर..,” आशाळभूत शेतकरी हतबलपणे म्हणाला.




(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस.,एम.डी. (बालरोग))
(© सदर लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.)
(सदर लेखकाचा दुसरा वाचनीय ब्लॉग-

Comments

  1. कोणत्या प्रसंगी कसे वागावे हे लोकांना आता समजेना झाले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. लोकांना शेतकऱ्यांच्या दुःखाची व कष्टाची काडीची ही किंमत राहिली नाही आणि दुसरीकडे एवढं त्याच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही हा शेतकरी मदतीचा हात द्यायलाही मागेपुढे बघत नाही खरोखरच हा विरोधाभास कधी संपणार या समाजामधील.

      Delete
    2. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:11 PM

      खरंय... आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

      Delete
  2. छोट्याशा लेखातून खरंच लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण आणि मोजक्या शब्दात समाज प्रबोधन वाखाण्याजोगे आहेवाखाण्याजोगे आहे

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:15 PM

      आपल्या निरीक्षणाला जागण्याचा माझा कायम प्रयत्न राहील.

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभार!

      Delete
  3. ज्याची त्याची संक्रान्त वेगळी. कोणाची गोड़ तर कोणाची कडू, कोणाची लक्ख प्रकाशमय तर कोणाची मिट्ट काळोखी.
    खूपच मार्मिक आणी विचार करण्यास भाग पाडणारा प्रसंग आपण अधोरेखित केला आहे. धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:15 PM

      बरोबर बोललात.

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल आपले आभार!

      Delete
  4. अमित
    छोट्या लेखातून खुप छान मार्मिक वास्तव मांडल आहेस
    अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:16 PM

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      Delete
  5. जनता भावना शून्य झालीय

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:16 PM

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

      Delete
  6. सत्य परिस्थिती आहे ,कुणालाही शेतकऱ्यांची परिस्थिती माहीत नाही ,अगदी सरकार देखील असेच वागत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:17 PM

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

      Delete
  7. वास्तव दाखवणारा लेख शेतकऱ्याविषयी कोणालाही काही वाटत नाही अप्रतिम लेख दादा 👌

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:18 PM

      आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी बहुमोल आहे.

      Delete
  8. साहेब. तुम्ही मोजक्या शब्दांत शेतकर्यांची व्यथा मांडलीत.... तसेच समाजातील कष्टकरी व गर्भश्रीमंत लोकांच्यातील दरी पण आपण एका वाक्यात दाखवलीत... प्रसंग कोणता.. आपण काय मागतोय याचे तारतम्य काही लोकांना नसते... हे पण आपण दाखवलेत.... अशाच कथा येथून पुढेही येत राहोत... धन्यवाद 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:19 PM

      आपल्या प्रेमळ सूचनेबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

      Delete
  9. असंवेदनशील समाजाचे छोटेसे प्रातिनिधिक उदाहरण दर्शवणारा लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:20 PM

      तसाच प्रयत्न मी केला आहे.

      Delete
  10. नमस्ते सर , खुप छान वास्तवशी निगडित, आणि तितकेच मार्मिक लिखाण केले आपण, परंतु फास्ट फूड खाऊन लोकं भावना शुन्य झाली आहेत.शिवाय निसर्गाशी निगडीत रहाणीमान संपल आहे . भावनांची कदरच राहिलेली नाही.शेळी गेली जिवानिशी खाणारा म्हणतो वातड , अशातला प्रकार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. अमितJanuary 30, 2026 at 12:21 PM

      आपण म्हणता ते दुर्दैवाने खरे आहे.

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले आभार!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मरणाचा चॉईस... (The choice of death...)

“मरणाचा चॉईस” (ललित लेख ३३, © डॉ. अमित) * तळटीप स्टेशनात विश्रांती घेणारे मालगाडीचे इंजिन शेजारच्या इंजिनाला म्हणाले, “माझी चाकं धुऊन मी केलेलं पाप जाणाराय का? धुवायचं सोड; ते लपवता तरी येणारंय का?” . . . “... आपण माणसं थोडीच आहोत; गंगेच्या पाण्यात डुबकी मारून ‘केलेली’ पापं ‘धुवायला’..?” . . . दुसरे इंजिन बिथरून म्हणाले, “झालंय काय तुला आज? चक्क ‘माणसा’सारख्या पापपुण्याच्या गोष्टी करतोयंस..!” . . . “... काय करू मग, सांग ना... काल ‘त्या’ गोरगरिबांना मी चाकाखाली चिरडले... रक्तामासांने भिजलो... ‘घामा’ने दरवळलो... चाकं धुतली; पण, झालेल्या पापाचं..?” . . . “... कसलं पाप? उलट जीवन‘चक्रा’तून ‘सोडवलंस’ तू त्यांना... आजाराने नाहीतर भुकेने; मरणारच होते ते... आणि, मरायचा तरी ‘चॉईस’ कुठंय गरिबांना..! जिवंतपणी कुणी विचारपूस केली त्यांची, जी आत्ता होणाराय?” . . . “... माणसं नाही रे; माणुसकीच मेलीय चाकांखाली..!” (* तळटीप- सदर चित्र हे मी फेसबुकवरून डाउनलोड केले असून ते बनविणाऱ्याचे नाव मला सापडले नाही. चित्राचे संपूर्ण क्रेडिट हे संबंधित चित्रकाराचेच आहे.) (...

“टू बी ऑर नॉट टू बी...” (To be or not to be...) (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2)

“टू बी ऑर नॉट टू बी...” (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2) (© डॉ. अमित, ललित लेख ३७) ✓ प्रसंग १- “कशाला एवढं ‘टेन्शन’ घेताय, सर? लाख-दोनलाख घ्या आणि करून टाका सही... तुम्हाला नको असतील तर ‘वर-खाली’ वाटून टाका...” “जोशी, फार बोलू नका... सेक्रेटरी आहात, सेक्रेटरीसारखे रहा... मला माहितीये ‘काय बरोबर, काय चूक’ ते...” “... साहेऽब, माझेही केस उगाच नाही पांढरे झाले... तुम्ही कालपरवाचे... तुमच्या भल्याचंच सांगतोय... बघा ‘वरून’ फोन येतो की नाही ते...” ✓ प्रसंग २- साहेबांना त्यांच्या साहेबांचा फोन येतो... “संदीप, तुला माहितीये, दरवर्षी १००-१२५ लोक आयएएस होतात... तू काही एकटाच नाहीस... मर्यादेत रहा... रहेजाच्या फाईलवर सही करून टाक... आदेश समज हवंतर...” “... पण, सर..,” फोन कट होतो... ✓ प्रसंग ३- “काय करू मी..? माझे संस्कार, तत्त्वं, स्वच्छ चारित्र्याची तळमळ, गरिबांना न्याय... सगळं एकदम पाण्यात..! ” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com